एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार? चालत्या गाडीमध्ये टायर बाहेर आले…

महाड दि १६( मिलिंद माने)– रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा कारभार अनागोंदी असल्याचे पुन्हा एकदा आज स्पष्ट झाले आहे बोरिवली मुरुड एसटी बस टायर धावत्या बस मध्ये बाहेर बाहेर आला, मात्र ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे अपघात टाळण्याची घटना आज मुरुड तालुक्यातील विहुर गावामध्ये घडली.
महाड तालुक्यात महाड दापोली रोडवर एसटी महामंडळाच्या बसेसचा निसरड्या रस्त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडल्या असतानाच आज मुरुड तालुक्यात बोरवली वरून मुरुडला येणारी एम एच २०. बी एल. ३८०८ या क्रमांकाची बस विहुर गावाजवळ आली असता चालत्या गाडीमधून बसच्या उजव्या बाजूचे मागील दोन्ही टायर बाहेर आले. मात्र ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात होता होता वाचला.
रायगडात सत्ताधारी भाजपा व सत्ताधारी राष्ट्रवादी तसेच सत्ताधारी शिवसेना शिंदे गट यांचे आमदार व मंत्री असताना मात्र सर्वसामान्यांच्या एसटी वाहतुकीकडे सर्वच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने एसटी बसेसच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना एकही लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठविताना दिसत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.
आता पावसाळा चालू झाला आहे त्यातच शालेय विद्यार्थि, महाविद्यालयीन विद्यार्थी. दररोज शाळा महाविद्यालयात इजा करणार असल्याने जर चालत्या बसमध्ये असा अपघात झाल्यास याला कोण जबाबदार असा सवाल एस टी महामंडळातून प्रवास करणारे असंख्य जिल्ह्यातील प्रवासी सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत. ML/ML/MS