दोन दिवसीय हिन्दी राजभाषा संमेलनास झाली सुरूवात
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी भाषा ही आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक असून त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये भारतीयांनी कुठेही कमी पडू नये आणि या भाषेला जगाच्या स्तरावर नेण्याकरता सर्वानीच पुढे आले पाहिजे असा सूर पुण्यात सुरु असलेल्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात आज उमटला.
पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे आजपासून दोन दिवसीय राजभाषा संमेलनास सुरवात झाली असून या संमेलनाकरता संपुर्ण देशातून केंद्र सरकारच्या विविध खात्यातील सचिव, अधिकारी उपस्थित होते. राजभाषा 2047 या परिसंवादामध्ये राज्यसभेचे उपसभापती हरिवंश,
राज्यसभा खासदार राकेश सिन्हा,संसदीय राजभाषा समितीचे उपाध्यक्ष भतृहरि महताब , गिरीषनाथ झा सहभाग घेतला होता.
2047 पर्यत हिंदीचे महत्व संपूर्ण जगाला कळण्याकरता आणि जगाच्या भाषेच्या प्रवाहात हिंदी या भाषेचे अढळ स्थान निर्माण करण्याकरता मोदी सरकारने विविध पावले उचलली असून याकरता एआय तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाणार असल्याचे गिरीष नाथ झा यांनी सांगितले.
शालेय जीवनात मातृभाषेसोबत राजभाषा हिंदीचे महत्व विद्यार्थ्यांना कळणे गरजेचे आहे याकरता व्यावहारिक जीवनात हिंदीचा प्रचार केला गेला पाहिजे असे खासदार राकेश सिन्हा यांनी यावेळी सांगितले.दरम्यान दोन दिवस सुरु राहणा-या या संमेलनात हिंदी विषयक विविध गोष्टीबाबत अधिकारी उपस्थिताशी संवाद साधणार असून उद्या या संमेलनाचा समारोप सायंकाळी होणार आहे.
ML/KA/SL
14 Sept. 2023