हळदीचे दर घसरल्याने शेतकरी वर्ग अडचणीत

सांगली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
जिल्ह्यात हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. गेली दोन वर्षे वायदा बाजारामुळे हळदीचे दर सुमारे 4000 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला हळदीचे दर वाढवले जातात. नंतर चार ते पाच हजार रुपयांनी हळदीचे दर पाडले जातात. यावर कुणाचेच नियंत्रण नाही. हळद उत्पादन, विक्री, प्रक्रिया हळद पूड निर्मिती, एगमार्क, निर्यात या सर्व सुविधा सांगलीत आहेत. पण हळद दराच्या तेजी-मंदीमुळे उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. हळदीची संशोधन केंद्रे अनेक ठिकाणी झाली पण उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. व्यापारी ठरवून दर पाडत असल्याचा आरोप या संदर्भात केला जातो. गेल्या वर्षी हळदीला 31 हजार रुपये क्विंटल दर मिळाला तर यंदा तो कमी होत गेला. कोरोना नंतर हळदीची मागणी वाढली आणि दरही वाढले पण आज मात्र हे दर कमी होत चालले आहेत.