तुळजाई बोट दुर्घटनेतील तिघांचे मृतदेह ५० तासांनंतर सापडले.

 तुळजाई बोट दुर्घटनेतील तिघांचे मृतदेह ५० तासांनंतर सापडले.

अलिबाग दि २८– रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथून मच्छीमारी साठी निघालेली ‘तुळजाई ही वोट शनिवारी खांदेरी किल्ल्यानजीक समुदात लाटांच्या जोरदार पहाटामुळे पलटी झाली होती.
या दुर्घटनेत बोटीवरील आठ मच्छीमारांपैकी पाच जण सुटून किनाऱ्यावर पोहोचले होते. मात्र तिघे बेपत्ता झाले होते. अखेर तव्वल ५० तासांच्या शोधानंतर आज सकाळी तिघांचे मृतदेह सापडले.

नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा, उरण) आणि मुकेश यशवंत पाटील (डा. करना, उरण) अशी मृत मच्छीमारांची नावे आहेत.
तिघांचे मृतदेह अनुक्रमें सासवणे, दिघोडे व किहीम किनाऱ्याजवळ आढळले, अशी माहिती मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. मनोज गणपत कोळी यांच्या मालकीची ‘तुळजाई नावाची बोट (IND MH 7MM 1405) २६ जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास करंजा बंदरातून मासेमारीसाठी निघाली होती.

खांदेरी किल्ल्यानजीक समुदात लाटाच्या जोरदार पहारामुळे बोट पलटी होऊन जलसमाधी मिळाली.
बोटीवटील पाच मच्छीमार हेमंत गावंड (आवरें), संदीप कोळी व टीशन कोळी (करंजा), शंकर भोईर व कृष्णा भोईट (आपटा, पनवेल) हे ९ तास पोहत किनाऱ्यावर आले होते. वातावरण व समुद्र स्थिती खराब असल्याने प्रवासी वाहतूक व मासेमारीस बंदी असतानाही काही बोटी विनधास्तपणे समुदात उतरत असल्याचे दिसून येत आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *