आदिवासी बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर….

ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यलयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. वर्षानुवर्षे आदिवासी आपल्या हक्काच्या जमिनी आपल्या नावांवर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र ते बाजूला राहिले उलट वनविभागाच्या वतीने राहती घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचा आरोप आदीवासी बांधवांनी केला.
जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी,मुरबाड,ठाणे, कल्याण,अंबरनाथ या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाऱ्या आदिवासी कुटुंबांच्या राहत्या घरांवर वनविभागाने तोडक कारवाई करून आदिवासींना बेघर केल्याचा आरोप केला आहे. या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील समस्त आदिवासी बांधवांनी जिल्ह्याधिकारी कार्यलयाबाहेर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. मोर्चा नंतर त्याच ठिकाणी ठिय्या मांडत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
ML/KA/SL
23 May 2023