पाऊस आणि पुरामुळे दोन प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प…

 पाऊस आणि पुरामुळे दोन प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प…

गडचिरोली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाल्याने आणि गोसीखुर्द धरण भरल्याने, धरणातील पाणी मोठ्या प्रमाणत विसर्ग करण्यात येत आहे ,त्यामुळे छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली- आरमोरी आणि गडचिरोली- चामोर्शी या दोन मार्गांवरील वाहतूक आज १० वाजता दरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे अडीच मीटरने तर ११ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून १७ हजार ३५ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली नजिकच्या पाल नदीला पूर आला असून, गडचिरोली – आरमोरी मार्ग बंद आहे. शिवाय शिवणी आणि गोविंदपूर नाल्यांनाही पूर आल्याने गडचिरोली
-चामोर्शी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ML/KA/SL

16 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *