मुंबईतल्या पाच टोलनाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना टोलमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबईत येणाऱ्या पाचही टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईत नागरिकांसोबतच मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांना होणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून होणार अंमलबजावणी होणार आहे. या टोलमाफीतून अटल सेतू वगळण्यात आला आहे.मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना हलक्या वाहनांवर टोलचा भार होता. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हलक्या वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.