टोल नाक्यावर सरकार सोबत मनसेचे ही कॅमेरे

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टोलनाक्यांवर पारदर्शकता यावी यासाठी पुढचे 15 दिवस सरकारचे कॅमेरे लावले जातीलच, पण मनसेही कॅमेरे लावून वॉच ठेवेल,असा निर्णय झाल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरे यांच्या घरी आज मुंबई आणि महाराष्ट्रातील टोलच्या मुद्द्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात बैठक झाली.यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले 9 वर्षानंतर मी सह्याद्री वर गेलो. त्याचवेळी कळलं होतं की टोल संदर्भातील अॅग्रीमेंट 2026 पर्यंत संपणार होते हे मला माहित आहे. 2026 पर्यत अॅग्रीमेंट बँकेसोबत झाल्याने त्यात आता काही करता येत नाही. ठाण्यातील 5 एन्ट्री पॉईंट्सवर टोल वाढविण्यात आले. त्याबाबत मनसेच्या अविनाश जाधव यांनी आंदोलन केले. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले की चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल नाही असे ते म्हणाले. लोकांना वाटलं की आम्हला फसवलं जातंय की काय?
टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील. आणि किती गाड्या या टोलवरून जातात हे कळेल. ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल. अॅम्ब्युलन्स,स्वच्छतागृह, सीसीटीव्हीचे कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होतोय लोकांना ते कळेल.
करारमधील नमूद उड्डाणपूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. आयआयटी मुंबईकडून हे ऑडिट करण्यात येईल. 5 रुपये वाढीव टोलबाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवा आहे. त्यानंतर वाढीव टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल,असे राज ठाकरे म्हणाले .
यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.
आनंद नगर टोलनाक्यावरून ऐरोली टोल नाक्यावर जायचे असेल तर एकच टोल भरावा लागेल. याचा निर्णय 1 महिन्यात घेतला जाईल.
असे सांगून ते म्हणाले की,हरी ओम नगर मुलुंडमधील रहिवाशांना ब्रिज बांधून देण्यात येईल त्यांना टोल भरण्याची गरज नसेल.
राष्ट्रीय महामार्गावर जर रस्ते खराब असतील तर त्या ठिकाणचा टोल रद्द करण्याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारशी 15 दिवसात बोलेल.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि एमएसअरडीसीचे 14 असे टोलबाबत महिन्यात निर्णय घेतला जाईल हे टोल बंद करावे अशी आमची मागणी आहे, असे ही राज ठाकरे म्हणाले.
अवजड वाहनांना शिस्त लावण्यासाठी एक लेन असावी यासाठी दादा भुसे विचार करतील.
प्रत्येकाला वाटंत की आम्हला रस्ते चांगले मिळावे . मी नितीन गडकरी यांच्याशी सुद्धा बोलणार आहे.रस्ते सुधारण्याची जबाबदारी ही टोलवाल्यांची आहे,. राज्य सरकार अखत्यारीत असलेल्या टोलबाबत निर्णय राज्य सरकार करेल ही राज ठाकरे यांनी सांगितले.
ML/KA/PGB 13 Oct 2023