तिरूपती बालाजी मंदिराचे 4 तास शुद्धीकरण, पुजेवेळी भगवान व्यंकटेश स्वामींची माफी मागितली

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याने देशभरातील भाविक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर देशातील अनेक मंदिरांनी देवाला बाहेरुन येणाऱ्या प्रसादावर बंदी घातली आहे. दरम्यान, बालाजी मंदिरातील लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (23 सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे ४ तास शुद्धीकरण करण्यात आले. या पूजेवेळी मंत्रोच्चाराद्वारे भगवान व्यंकटेश्वर स्वामींची क्षमा मागण्यात आली.
ML/ML/PGB 23 SEP 2024