काळ निर्घृण असतो, तो उलटल्यावर अद्दल घडेल

 काळ निर्घृण असतो, तो उलटल्यावर अद्दल घडेल

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळ निर्घृण असतो तो उलटल्यावर अद्दल घडेलच , सध्याचा भाजपचा कारभार कलंक च आहे अशी टीका शिवसेना ऊबाठा चे उध्दव ठाकरे यांनी केली आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काल नागपुरात जे बोललो त्यात एवढे लागण्यासारखे काय होते असा सवाल ही त्यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्री ने शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता आणि घालमेल सुरू असल्याचे ही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता , तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलता , ज्यांना कलंकित करता त्यांना कलंक हा शब्द का झोंबावा असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.

ML/KA/SL

11 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *