या मराठी अभिनेत्याने दिली पहलगामला भेट

पहलगाम, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेल्याने काश्मीरमधील पर्यटनाला उतरती कळा लागली आहे. पर्यटक काश्मीर सहलींचे बुकींग रद्द करत आहेत. या भीतिदायक वातावरणात मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी याने धाडस दाखवून पहलगामला भेट दिली आहे.
‘हिंदोस्तां की ये जागीर है, के डर से हिम्मत भारी है. हिंदोस्तां की ये जागीर है, के नफ़रत प्यार से हारी है. चलिए जी कश्मीर चलें, सिंधु, झेलम किनार चलें.. मैं आया हूँ , आप भी आएँ,’ असं आवाहन त्यांनी सोशल मीडियाद्वारे केलं आहे.
‘पहलगाममधील स्थानिक आपल्यासारखेच धक्क्यात आणि दु:खी आहेत. पण त्याचसोबत तिथले रस्ते, पायवाटा पुन्हा पर्यटकांनी भरतील अशी त्यांना आशा आहे. चलिए जी कश्मीर चलें,’ असं अतुल कुलकर्णी यांनी पहलगाममधल्या स्थानिकांची भेट घेतल्यानंतर म्हटल आहे.
अतुल कुलकर्णी व्यतिरिक्त, सुनील शेट्टी आणि अली गोनी सारखे सेलिब्रिटी देखील लोकांना शक्य तितके काश्मीरला भेट देण्याचे आवाहन करत आहेत.