देशातील लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष

 देशातील लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष

अहमदनगर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत म्हटले आहे.

पवार म्हणाले की, आज महाराष्ट्राची निवडणूक चार ते पाच टप्प्यांनी घेतली आणि दुसऱ्या बाजूने तमिळनाडूमध्ये बघितलं तर तमिळनाडूची निवडणूक एका दिवसात झाली, उत्तर प्रदेशची दोन दिवसांमध्ये झाली, मगमहाराष्ट्रातच चार किंवा पाच दिवस का? त्याचे कारण हे आहे, की मोदी साहेबांना खात्री नाही, त्यांना पुन्हा पुन्हा येता यावं, यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक त्यांनी बदललं आणि आज या पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत.

लोकशाही म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार घटनेने तुम्हाला दिला, आणि तो निर्णय तुम्ही मतपेटीद्वारे घ्यावा, याचा अर्थ संसदीय लोकशाही. आज त्याची चिंता सबंध देशात आहे.असे पवार यांनी सांगितले आहे.

ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या ज्या प्रकारे निवडणुका होत नाहीयेत, तसेच चित्र आपल्याला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. ते येऊ द्यायचं नसेल तर वाटेल ती किंमत देऊ, पण लोकशाही ही आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हा निकाल तुम्हा-आम्हा सर्वांना घ्यायचा आहे. असेही शरद पवार यानी म्हटले आहे.

ML/ML/SL

8 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *