कलंक शब्द पेटला, ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात काल उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कलंक शब्द वापरल्यानंतर त्याबाबतचा वाद पेटला असून भाजपने त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने पुकारली तर ठाकरे यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
काल कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी फडणवीस हे कलंक असल्याचे म्हटले होते, त्यानंतर लगेचच भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले . प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द कलंकित असल्याचा आरोप केला होता तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही भाषा हीन दर्जाची असल्याची टीका केली होती.
आज नागपूर , मुंबई , औरंगाबाद अशा विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन करीत प्रतिकात्मक शव यात्रा काढली , त्यांचा पुतळाही जाळला. उध्दव ठाकरे यांनी देखील आपण काय चुकीचे बोललो असा प्रति सवाल केला .
प्रसारमाध्यमांसमोर बोलताना फडणवीस यांनी ठाकरे यांची मानसिक स्थिती योग्य नसून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे असे म्हटले. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची ही अवस्था झाल्याचे सांगितले.
ML/KA/SL
11 July 2023