राज्याने ही आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे

 राज्याने ही आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे

नागपूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने तयार केलेल्या आर्थिक निकषांवरील आरक्षणाच्या धर्तीवर राज्याने ही आणखी दहा टक्के आर्थिक निकष आरक्षण देऊन त्यातून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी भाजपाच्या आशिष शेलार यांनी आज मराठा आरक्षणावरील चर्चेदरम्यान केली , काल अर्धवट राहिलेली चर्चा आज सभागृहात पुन्हा सुरू झाली त्यावेळी ते बोलत होते.

रोहिणी आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या गेल्या तर उद्भवणारी स्थिती लक्षात घेणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. ज्यांना कुणबी नोंद सापडेल त्यांना ते द्यावं , सध्या आर्थिक निकष लावून आरक्षण मिळतं त्यात सुमारे साठे आठ टक्के मराठ्यांना फायदा मिळतो , राज्य सरकारने आणखी असेच आरक्षण दिलं तर आणखी तेवढ्याच मराठा समाजातील नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि हे आरक्षण न्यायिक प्रक्रियेत टिकेल असा विश्वास वाटतो असं शेलार म्हणाले.

बिहार सरकारच्या धर्तीवर देशात सर्व ओबीसी समाजाच्या गणनेची व्यवस्था करण्यात यावी , त्यानंतर ओबीसी आणि मागास प्रवर्गातील लोकांना आरक्षण वाढवून देत मराठा समाजाला ही आरक्षण द्यावे अशी मागणी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी या चर्चेत केली.

ML/KA/SL

13 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *