बार्टी प्रकरणी विरोधकांनी केला सभात्याग

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुण्यातील बार्टी संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याकामी राज्यभरात १६ जिल्ह्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड न केल्याने सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याच्या प्रश्नावर सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत तो राखून ठेवण्याची मागणी केली मात्र अध्यक्षांनी ती नाकारली , त्यामुळे विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा तयारी करून घेण्यासाठी चा हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे, त्यावर नियमित सुनावणी सुरू आहे असे सरकारचं उत्तर होतं. मात्र तरीही आपण त्यावरील उपप्रश्र्न विचारल्यास उत्तरे देऊ असं प्रभारी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. मात्र आशीष शेलार यांनी आधी , मग राष्ट्रवादी च्या जयंत पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत मूळ प्रश्नाचे उत्तर आले नाही , त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवा अशी मागणी केली, विरोधी सदस्य यासाठी आक्रमक झाले.The opposition boycotted the meeting in the Barti case
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारची भूमिका ग्राह्य धरण्यात यावी , न्यायप्रविष्ट बाबींवर सभागृहात होत नाही असं स्पष्ट केलं आणि सदस्यांची मागणी नाकारली यावर विरोधकांनी सभात्याग केला. अध्यक्षांनी या प्रश्नाची बाजू समजून घ्यावी आणि त्यावर पुन्हा चर्चा करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
रुग्णालयांचे होणार फायर ऑडिट
मुंबईतील खासगी आणि सरकारी अशा सर्वच्या सर्व १५७४ रुग्णालया पैकी ६६३ रुग्णालयांनी अग्निशामक यंत्रणा बाबतच्या बाबींची पूर्तता केलेली नाही त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या ९० दिवसात त्याबाबत विशेष यंत्रणा नेमून पुन्हा तपासणी केली जाईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली .हा प्रश्न सुनील राऊत , सुनील राऊत, राम कदम आदींनी उपस्थित केला होता.
ML/KA/PGB
18 July 2023