विरोधकांना देशद्रोही म्हटलंच नाही

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांना देशद्रोही असं म्हटलेलं नाही मात्र देशद्रोही कुख्यात गुंड दाऊदसोबत संबंध प्रस्थापित झालेल्या माजी मंत्री नवाब मलिक याचं समर्थन करणार्यांना देशद्रोही म्हटल्याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आज हकक्कभंगाची सूचना दाखल केली , त्यांनतर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करताना, नवाब मलिक यांच्याविरोधात दहशतवादाला प्रोत्साहन देणारी कलमं लावण्यात आली मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही असं सांगत मलिक यांना पाठिंबा देणाऱ्यांसोबत चहापान करणार नाही, असं म्हटल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि विरोधी पक्षातील सदस्य अनिल परब आणि शशिकांत शिंदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात मी देखील होतो तेव्हा मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशीच आमची भूमिका होती मात्र तत्कालीन नेतृत्वाला ते करता आलं नाही असं शिंदे यांनी सांगितलं.
भाजपा शिवसेना युती सरकारला महाराष्ट्रद्रोही म्हणता मात्र २०१९ ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करवून मतदारांच्या विरुद्ध भूमिका घेणे हा महाराष्ट्रद्रोह नाही का?असा प्रश्न शिंदे यांनी विरोधकांना उपस्थित केला.The opponents are not called traitors
मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला किंवा विरोधकांना देशद्रोही म्हटलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे हा हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवायचा की नाही याबद्दल निर्णय देण्यात येईल असं उपसभापती नीलम गोर्हे यांनी सांगितलं.
ML/KA/PGB
2 Mar. 2023