मुंबई महापालिका आयुक्तांना अखेर हटवले

मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली करण्यात आली आहे. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महानगरपालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची बदली करावीच लागेल, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारीला दिले होते. मात्र राज्य सरकारने त्यावर काहीही कारवाई न करता पुन्हा ही बदली रोखण्यासाठी पत्र लिहिले होते. ती मागणी फेटाळून राज्य सरकारने आता थेट चहल यांची बदली केली आहे.
इकबाल सिंह चहल यांनी मे २०२० मध्ये करोना काळात टाळेबंदी असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वीचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची तत्कालीन राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली होती. टाळेबंदीच्या काळात चहल यांनी रात्रीच पदभार स्वीकारला होता.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबलसिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी वेलारासू यांचीही बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेर दिले होते. मात्र त्यावरही काहीही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. आता या दोन अतिरिक्त आयुक्तांची बदली कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
SW/ML/SL
18 March 2024