आमरण उपोषण सुरूच; मनोज जरांगे मागण्यांवर ठाम

जालना, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारने जीआरमध्ये दुरुस्ती केल्यावरच आपण पाणी पिऊ, जी आरमध्ये काही १/२ किरकोळ दुरुस्त्या बाकी आहेत त्या होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले असून सरकारी समझोत्याचा प्रयत्न विफल ठरला आहे.
सरकारचा निरोप घेऊन माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी बंद लिफाफ्यातून सरकारचा जी.आर. जरांगे यांना दिला. पण त्यातूनही गेल्या १२ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेले हे उपोषण आज तरी सुटू शकले नाही. काल रात्री उशिरापर्यंत जरांगे यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती.
त्यानंतर जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे. तो त्यांनी द्यावा,अशी मागणी आज अर्जुन खोतकर यांनी जरांगे यांना केली. त्यावर जरांगे यांनी काय वेळ घ्यायचा तो घ्या मात्र आमच्या मागण्या मान्य करा असे उत्तर दिले.
यामुळे सरकार आणि मनोज जरांगे यांची चर्चा विफल ठरली.
मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन माजी मंत्री खोतकर आज जरांगे यांच्या भेटीला आले होते. त्यांनी मुख्यमंत्री यांनी दिलेले पत्र जरांगे याना दिले त्यावर सर्वांच्या समक्ष जरांगे पाटलांनी समितीशी चर्चा केली आणि आपला निर्णय सर्वांना पुढे सांगितला. या शासन निर्णयात जरांगे यांनी मागणी केलेल्या तीन सुधारणा पैकी यात कोणताच बदल झाला नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजून काहीच कारवाई झाली नाही, सरसकट मराठा शब्दाचा उल्लेख आहे 2004 च्या जी आर प्रमाणे सुधारणा अशी त्यांची मागणी आहे.
समाज बांधवांनी शांततेने आंदोलनात सहभागी होऊन आरक्षणाची चर्चा आणखी दोन चार वेळा होईल, तरी कोणीही कायदा हाती घेऊ नये शी विनंती ही जरांगे यांनी उपस्थितांना आणि समस्त मराठा समाजाला यावेळी केली आहे.
ML/KA/SL
9 Sept. 2023