सरकारने आर्टीची घोषणा केल्याने मातंग समाजाचे उपोषण स्थगित

 सरकारने आर्टीची घोषणा केल्याने मातंग समाजाचे उपोषण स्थगित

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत सरकारने गांभीर्याने विचार करत अधिवेशन काळत सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य केल्याची केल्यामुळे मातंग समाज आनंदोत्सव साजरा करत आहे. मात्र सरकारने याबाबत त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी मातंग समाज करत आहे.

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन झाली पाहिजे. मातंग समाजाला ८% आरक्षण मिळाले पाहिजे या मागण्यासाठी आझाद मैदानात १८ जानेवारी पासून आमरण उपोषण केल्यामुळे सरकारने या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्यामुळे आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.

सरकारने जर या मागण्यांबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन पुन्हा करण्यात येणार असल्याची मातंग क्रांती महामोर्चा महाराष्ट्र यांच्या कोअर कमिटी ने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मातंग क्रांती महामोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने समाजीक उन्नतीकरिता प्रमुख विकासाच्या विविध मागण्या घेऊन गेली अनेक वर्षे अत्यंत संविधानीक पध्दतीने संघटना लढा लढत असून वेळोवेळी आमरण उपोषणाची हाक देण्यात आली होती. सरकारने आता गांभीर्याने अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापनेची घोषणा केली आहे. याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी कोर कमिटी चे अशोक ससाणे , सुनिता तुपसौंदर्य, आवण नाटकर, विकास तांबे, देवेंद्र खलसे,मोहन राव, राजेंद्र साठे, सुदाम आवाडे,शामराव सकट यांनी पत्रकार परिषदेत केली. The hunger strike of the Matang community was called off after the government declared Arti

ML/KA/PGB
28 Feb 2024

.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *