देशातल पहिलं ‘रेसिड्यू फ्री’ कृषी प्रदर्शन

पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
देशात प्रथमच ‘रसायन अवशेष मुक्त’ शाश्वत शेतीवर आधारित कृषी प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुणे कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. हे प्रदर्शन पुणे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ६ मार्च ते १० मार्च दरम्यान भरवले जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या प्रदर्शनात सहभागी होण्याची उत्तम संधी आहे. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित करणे आणि ‘फॅमिली फार्मर’ ही नवीन संकल्पना रूजविणे हा आहे.
या प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे शेतीतील रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे असा आहे. यामुळे शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळेल आणि नागरिकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्न मिळण्याची शक्यता वाढेल. याशिवाय, अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवून शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल.
SL/ML/SL
12 Feb. 2025