बालासोर रेल्वे अपघाताचे कारण झाले स्पष्ट

 बालासोर रेल्वे अपघाताचे कारण झाले स्पष्ट

भूवनेश्वर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्यात ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात २९३ जणांचा मृत्यू झाला होता तर १ हजार हून अधिक लोक जखमी झाले होते. हा गेल्या दोन दशकांतील देशातील सर्वांत भीषण अपघात होता. हा विचित्र आणि भीषण अपघात कशामुळे झाला हे तपासण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सर्वतोपरिने प्रयत्न सुरू होते. अखेर या अपघाताचे कारण स्पष्ट झाले आहे. 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघाताबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS) यांचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, रेल्वे रोड बॅरियरची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नेटवर्कची स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा खराब केली होती.लोकेशन बॉक्सच्या आत वायरचे चुकीचे लेबलिंग होते. चुकीच्या सिग्नलमुळे ट्रेन चुकीच्या रुळावर गेली.

CRS अहवालात समोर आलेली कारणे

लेव्हल क्रॉसिंग लोकेशन बॉक्समध्ये सर्व वायर चुकीच्या पद्धतीने जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामात गडबड होत असल्याने चुकीची कामे होत असल्याचे निदर्शनास येत होते. वर्षानुवर्षे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.
या अपघातासाठी सिग्नल विभागाला प्रामुख्याने जबाबदार धरले जात आहे.
सिग्नलिंग कंट्रोल सिस्टीममधील बिघाड ओळखू न शकलेल्या स्टेशन मास्टरचेही नाव अहवालात घेण्यात आले आहे.
लोकेशन बॉक्स डायग्रामचा वापर बालासोरमधील बहनागा बाजारच्या लोकेशन बॉक्ससाठी देखील केला गेला. ही एक चुकीची चाल होती, ज्यामुळे चुकीचे वायरिंग झाले.
अपघाताच्या दोन आठवड्यांपूर्वी खरगपूर विभागातील बांक्रा नयाबाज स्थानकावर सदोष रिंग आणि सदोष वायरमुळे अशीच घटना घडली होती. त्यानंतरही वायरिंग दुरुस्त केली असती तर बालासोर दुर्घटना घडली नसती.
कोरोमंडल एक्सप्रेसला मुख्य मार्गासाठी हिरवा सिग्नल होता. तर ट्रेनची दिशा ठरवणारी यंत्रणा चुकीच्या पद्धतीने ‘लूप लाइन’कडे निर्देश करत होती.

यावर प्रतिक्रिया देताना, टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी केंद्र सरकार प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा पीआरला प्राधान्य देत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भारतीय रेल्वेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे केंद्राने दुर्लक्ष केले आहे. टीएमसी खासदाराने दावा केला की देशात प्रवासी गाड्या धावते शवागार बनले.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, अहवालात तेच समोर आले आहे, ज्याबद्दल आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत. वंदे भारत आणि बुलेट ट्रेनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष कॅडरशी छेडछाड करण्याच्या ध्यासात सरकारने मूलभूत गोष्टींशी तडजोड केली आहे. रेल्वे सुरक्षेचा प्रश्न केवळ छायाचित्रे क्लिक करण्याचा मुद्दा नाही.

SL/KA/SL
4 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *