उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 13 पैकी 11 श्री सदस्यांच्या मृतदेहाची ओळख पटली

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवी मुंबई खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 13 पैकी 11 श्री सदस्यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे.यामध्ये 8 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे. एका मृतदेहाची अद्याप ही ओळख पटलेली नाही.The bodies of 11 out of 13 members who died due to heat stroke were identified
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा 16 एप्रिल रोजी खारघर (नवी मुंबई) येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सुमारे राज्यभरातून २० लाख अनुयायी उपस्थित होते. या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 13 पैकी 11 श्री सदस्यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे.यामध्ये 8 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे.
यामध्ये महेश नारायण गायकर (वय 42 ),रा. वडाळा मुंबई (मूळ गाव म्हसळा मेहंदडी),जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54),रा. म्हसळा रायगड., मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51) रा. गिरगाव मुंबई (मुळगाव श्रीवर्धन),स्वप्निल सदाशिव केणी (वय 30)रा. शिरसाटबामन पाडा विरार, तुळशीराम भाऊ वांगड (वय 58 )रा.जव्हार पालघर, श्रीमती कलावती सिद्धराम वायचळ (वय 46)रा. सोलापूर,श्रीमती भीमा कृष्णा साळवी( 58) रा.कळवा ठाणे,श्रीमती सविता संजय पवार. (42)रा.मुंबई, श्रीमती पुष्पा मदन गायकर (वय 64 )रा.कळवा, श्रीमती वंदना जगन्नाथ पाटील(वय 62) रा.करंजाडे.अशी मृतांची नावे आहेत.तर एक 50 ते 55 वयोगटातील महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील एकूण 11 मृतदेह पैकी दहा मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले आहेत .तर एक मृतदेह बेवारस असून त्या महिलेचा वारसाचा शोध चालू आहे.
ML/KA/PGB
18 Apr 2023