बांगलादेश संघर्षाचा विपरित परिणाम मिरची उत्पादकांवर ही

छ संभाजीनगर दि ८-(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या मिरचीवर ही पडले असून मिरचीच्या दरात मोठी घसरण झाल्याने सिल्लोड चे शेतकरी संकटात सापडले आहेत.
बांगलादेशातील परिस्थितीमुळे शेतकरी, मजूर आणि व्यापारयावर संक्रात आली आहे. सध्या बांगलादेश मध्ये सुरू असलेल्या संघर्षमय वातावरणामुळे तेथील हिरवी मिरचीची बाजारपेठ बंद झाली असून भारत बांगलादेश दरम्यानची सीमा रेषा सुरक्षेतेच्या दृष्टीने बंद करण्यात आल्यामुळे छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून बांग्लादेशात जाणारी हिरवी मिरची ची जावाक पूर्णपने ठप्प झाल्याने तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मिरचीचे दर घसरल्याचा परिणाम मजुरी वरती ही झाल्याचे यावेळी दिसून आले आहे.
ML/ ML/ SL
8 August 2024