दहशतवाद्यांचा खात्मा केला AI च्या मदतीने, अखनूरमधल्या यशस्वी ऑपरेशननंतर लष्कराचा खुलासा

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये सोमवारी लष्कराच्या ताफ्यावर ॲम्ब्युलन्सवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. याबाबत लष्कराने मोठा खुलासा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखनूर ऑपरेशनमध्ये त्यांच्या टीमने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी AI चा वापर केला. एआयच्या मदतीने आम्हाला दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जलद आणि यशस्वी परिणाम मिळाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.