भारत-बांगलादेशच्या सीमेवर वाढला तणाव

ढाका, दि. १६ : भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष चालू असताना आता दुसरीकडे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भारत सीमेवरून काही लोकांना बांगलादेशच्या सीमेत पाठवत आहे, असा आरोप करत बांगलादेशने सीमेवर गस्त वाढवली आहे. याच कारणामुळे सध्या बांगलादेशने नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय नागरिकत्त्व नसलेल्या लोकांना भारताकडून बांगलादेशमध्ये पाठवले जात असल्याचा दावा बांगलादेशने केला आहे. सिलहट, मौलवीबाजार, खगराछारी, कुरीग्राम, सतखीरा, सुंदरबन या वेगवेगळ्या सहा सीमाभागांतून एकूण 340 बांगलादेशमध्ये जबरदस्तीने पाठवण्यात आल्याचं बांगलादेशने म्हटलंय. याच कारणामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सीमेवर होत असलेल्या या सर्व कथित प्रकारामुळे बांगलादेश सरकारने 9 मे रोजी भारताला एक पत्र पाठवले आहे. लोकांना बांगलादेशमध्ये पाठवण्याच्या या घनटांना लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून बांगलादेशने केले आहे. एखादी व्यक्ती खरंच बांगलादेशी असेल तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या व्यक्तीला बांगलादेशमध्ये परत घेतले जाईल. मात्र अशा पद्धतीने जबरदस्तीने होत असलेली घुसखोरी चुकीची आहे, असे बांगलादेशने म्हटले आहे.
या करावायांतून फक्त बांगलादेशी नागरिकच नव्हे तर रोहिंग्या शरणार्थी, तसेच अवैध पद्धतीने भारतात प्रवेश करणाऱ्यांनाही बांगलादेशमध्ये पाठवले जात आहे, असा बांगलादेशचा दावा आहे.