रथसप्तमीनिमित्त विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार
उस्मानाबाद, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विवेकानंद संस्कार केंद्र कन्याकुमारी शाखा, उस्मानाबादच्या वतीने आज रथसप्तमीनिमित्त उस्मानाबाद शहरातील सहा शाळांतील 755 विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले.
यानिमित्ताने सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद करण्यात आलं. तसंच संक्रमण काळातील रथसप्तमी सणानिमित्त प्रकटणारे सूर्याचे तेज स्वामी विवेकानंदांच्या ज्ञानतेजाप्रमाणे विद्यार्थ्यांनी आत्मसात करावं अस आवाहन यावेळी करण्यात आलं.
ML/KA/SL
28 Jan. 2023