सर्वोच्च न्यायालय म्हणते मागासवर्गीय श्रीमंतांनी आपला आरक्षण लाभ सोडावा

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागासवर्गीय कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या बहुतांश श्रीमंतांनी अन्य मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे लाभ सोडून द्यावेत, असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालया एका प्रकरणात सुनावणी करताना नोंदवले आहे.
मंगळवारपासून सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे पंजाब सरकारच्या अनुसूचित जाती व जमातींमधील पोटजातींना आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू झाली आहे. यात न्यायालय म्हणाले की, ‘मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेऊन जे श्रीमंत झाले आहेत, त्यांनी आरक्षणाचे लाभ सोडून देण्याची गरज आहे. समाजातील अन्य मागास लोकांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मागास समुदायातील श्रीमंतांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आरक्षण सोडून द्यावे. यामुळे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्या तथा आरक्षणाचे लाभ मिळत नसलेल्या मागासघटकांना लाभ मिळेल’.
न्यायलयाने म्हंटले की, आरक्षणामुळे भारतीय प्रशासकीय सेवेत आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांच्या मुलाबाळांना अथवा नातवंडांना आरक्षणाचे लाभ कशासाठी हवेत? असा प्रश्नही यावेळी न्यायालयाने उपस्थित केला आहे.
SL/KA/SL
8 Feb. 2024