सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल
नवी दिल्ली,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना कोणाची ? या विषयावर गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या या विषयाचा अंतिम निकाल काय लागतो याकडे कट्टर शिवसैनिकांसह सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. या निकालाकडे समस्त राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आजही याबाबत अंतिम निकाल जाहीर झाला नाही. आज सर्वोच्च न्यायालयात याबाबत जवळजवळ 3 तास युक्तिवाद झाला. युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे.
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली आहे. पुन्हा पाच न्यायाधीशांचे खंडपीठ रेबिया खटल्यावर पुनर्विचार करु शकते का यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाची मागणीवर 5 न्यायाधीशांच खंडपीठ सुनावणी करणार की हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. शिंदे गटासाठी आणि ठाकरे गटामध्ये अटीतटीची बनली आहे. जारी हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेले तरी या प्रकरणांमध्ये वेळ जास्त लागणार आहे.
SL/KA/SL
16 Feb. 2023