अत्याचार थांबवा आणि संवाद साधा
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारसू येथे सुरु असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी आहे आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. निसर्गसंपन्न कोकण जपणाऱ्या भूमिपुत्रांवर हे रावणराज्य चालवणारे सरकार पोलीसांकडून वार करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे.. पहिल्यांदा हा अत्याचार थांबवा! शासकीय सर्व्हे थांबवा! स्थानिकांशी संवाद साधा! फायदा कुणाचा होणार आहे हे सांगा! वाद वाढवण्यापेक्षा जाहीर संवाद साधा! अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
ज्याप्रमाणे मविआ सरकार ची अट होती की, प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं, तसं एक जाहीर प्रेझेंटेशन द्यावं, पारदर्शकता ठेवावी आणि अंतिम मान्यता ही भूमिपुत्रांची असावी! असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
ML/KA/SL
25 April 2023