राज्य सरकार करणार स्वतःहून वारस तपास, सातबारे अद्ययावत

 राज्य सरकार करणार स्वतःहून वारस तपास, सातबारे अद्ययावत

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात जमिनींचे सातबारा उताऱ्यावर अनेक वर्षे मयताची नावेच राहून त्याचा वारस तपास न करता तो सातबारा तसाच पडून राहतो, त्यामुळे अशा सर्व मालमत्तांचा वारस तपास शासन स्वतःहून करून पुढील दीड महिन्यात संबंधित अर्जदाराच्या अर्जाची वाट न पाहता त्या संबंधित सातबाऱ्यावर वारसांची नावे दाखल करण्याची मोहीम राबविण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

वारस तपास करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार यांना देण्यात येतील , त्यासाठी कोणालाही न्यायालयाचा आदेश आणण्याची गरज लागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व आमदारांनी आपल्या भागातील तहसीलदार , उपविभागीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा करावा असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले. ही मोहीम ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यांसाठी आहे असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

ML/ML/SL
24 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *