सामान्य लोकांसाठी आता स्टॅम्प पेपर लागणार नाहीत

 सामान्य लोकांसाठी आता स्टॅम्प पेपर लागणार नाहीत

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व सामान्य लोकांसाठी नेहमी लागणाऱ्या दाखल्यांसाठी आता स्टॅम्प पेपर खरेदीची गरज लागणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा निर्णय आज जाहीर केला आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह, शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ याद्वारे माफ करण्यात आले आहे.

याचा फायदा लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना मिळणार असून यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल. दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत.

ML/ML/SL

5 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *