आषाढी एकादशीनिमित्त सोडण्यात येणार विशेष रेल्वे गाड्या

जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक भाविकाला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन व्हावे, त्याचीही वारी घडावी म्हणून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेच्या वतीने विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 23 जून ते 3 जुलै या कालावधीत वेगवेगळ्या स्थानकावरून या गाड्या सोडल्या जातील.Special trains will be released on the occasion of Ashadhi Ekadashi
यात जालना रेल्वे स्थानकावरून थेट पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही विशेष गाडी 27 जून रोजी सुटणार आहे. यामुळे भाविकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घडणार आहे. दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी देखील गाड्यांची सोय करण्यात आल्याने भाविकांची मोठी सोय होणार आहे.
ML/KA/PGB
16 Jun 2023