सोयाबीनचे बाजारातील दर गडगडले शेतकरी वर्गात चिंता

सांगली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीन या शेतीमालाचे बाजारातील दर घसरले आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची चिंता त्यामुळे वाढली आहे. सोयाबीन तेलाच्या आयातीमुळे स्थानिक बाजारातील हे दर घसरले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी गेली काही दिवस दरवाढीची अपेक्षा करीत आहेत. सोयाबीन पिकासाठी 4,800 रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे. पण खरेदी केंद्र नसल्यामुळे माल कुठे घालायचा हा प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा आहे.
सोयाबीनची ही खरेदी केंद्रे सुरू व्हायला किमान एक महिना लागणार आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे आहे. यंदा सोयाबीन लागवड सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाली असली तरी मालाची आवक फारशी होण्याची शक्यता नाही बाजारातील अस्थिर दरामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. सरकारी खरेदी केंद्रे लवकर सुरू झाली तर शेतकऱ्यांना ती फायदेशीर ठरणार आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक होते. या दोन्ही राज्यात सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करायला मंजुरी देण्यात आली आहे. सोयाबीनचे बाजारातील दर टिकून राहावे यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत अशी मागणी उत्पादक शेतकरी करीत आहेत.
PGB/ML/PGB
11 Sep 2024