या वर्षातील पहिले सूर्यग्रहण: ३७ वर्षांनंतरचा दुर्मिळ योग आणि जागतिक उलथापालथीचे संकेत!

 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण: ३७ वर्षांनंतरचा दुर्मिळ योग आणि जागतिक उलथापालथीचे संकेत!

जितेश सावंत

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, दुपारी ०३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजता संपेल.ह्या ग्रहणाचा कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रावर अधिक प्रभाव दिसेल.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे.

या ग्रहणाचे वेगळेपण म्हणजे सुमारे ३७ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होत आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी कुंभ राशीत राहु, बुध, शुक्र आणि चंद्रही राहतील. असा योग यापूर्वी ७ मार्च १९८९ रोजी झाला होता.

हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे जिथे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, त्यामुळे सूर्याच्या सभोवताल एक “Ring of Fire” किंवा तेजस्वी वलय दिसते
ग्रहण दक्षिणी आफ्रिका, अंटार्कटिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात
जिम्बाब्वे, जाम्बिया, तंजानिया, नामीबिया, मॉरिशस, बोत्सवाना, मोजाम्बिक, अर्जेंटिना आणि चिली या भागांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. Usually The Eclipse leave its after effects for long duration

ह्या ग्रहणाच्या पत्रिकेचा विचार केला असता संपूर्ण जगात/देशात मोठी अस्वस्थता पसरेल.संपूर्ण जगात मोठे बदल घडतील. नैसर्गिक आप्पतीत वाढ. मोठे भूकंप, वादळे/तुफान/वायू प्रदूषण. युद्धयजन्य परिस्थिती निर्माण होईल, किंवा युद्ध सुरू होईल. बॉर्डरवर कुरापती वाढतील/भयंकर घटना/अत्याचार घडतील. दरड कोसळतील. उंचावरून पडण्याच्या घटना. शेजारील राष्ट्रे तसेच मित्र राष्ट्रे यांच्यासोबत संबंध बिघडतील.

हवाई अपघात. शांततेचा पुरस्कार करणाऱ्या देशावर संकटे, संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर ताण,उत्पन्नात घट.सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल,वृद्ध राजकीय नेत्यांना प्रतिकूल. राजकीय लोकांवर कारवाया, राजघराण्यातील तसेच मोठ्या पदावरील,अधिकारपदावर बसलेल्याना लोकांना प्रतिकूल/ मृत्यू. मंत्र्यांना प्रतिकूल. राजीनामे/ पदावरून पायउतार व्हावे लागेल. मोठ्या लोकांवर तसेच काही धर्माशी संबंधित लोकांवर मोठे आरोप होतील. मोठी बंड/चकमकी. काही ठिकाणी सत्ता परिवर्तन.
महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये येणाऱ्या काळात काही मोठ्या घडामोडी घडतील.
प्रजा व प्रशासनाचे मतभेद हिंसक विरोधात बदलणार.

संपाचे प्रमाण वाढेल ,शिक्षकांचे संप होण्याची शक्यता अधिक,सरकार,विरोधीपक्ष यांच्यातील मतभेद-विरोध वाढतच जाणार. बेकारीचे प्रमाण वाढणार. खून/दरोडे/माऱ्यामाऱ्या/मोठेहिंसाचार यात वाढ. मृत्युसंख्येत वाढ, म्युनिसिपाल्टी प्रतिकूल, अग्निकांडाच्या घटनांमध्ये वाढ.रोग्याच्या साथी पसरतील ,तापाची साथ पसरेल. सरकारचे दुर्लक्ष आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन भयंकर आपत्ती बनून लोकसंपत्तीला हानी पोहोचणार.

संसदेत अनपेक्षित परिस्थितीमुळे कामकाज अडचणीत येणार ,
अनुशासनहीनता किंवा अप्रिय वर्तनामुळे सदस्यांना राग येणार , ज्यामुळे सामान्य काम करणेही कठीण होणार.
मंत्र्यांच्या बेसावधपणे केलेल्या किंवा वादग्रस्त वक्तव्यांमुळे संसदेत तणाव आणि विरोध वाढणार. संसद सदस्यांच्या अपघाताची शक्यता.

लेखक/साहित्यिक/पत्रकार/लहान मुले/सुप्रीम कोर्टातील वकील,न्यायाधीशांना प्रतिकूल, मृत्यूची शक्यता /बुद्धिवादी लोक/स्त्रिया /ग्रंथकार/ ग्रंथप्रकाशक/शैक्षणिक क्षेत्रातील लोक/ बँकर याना प्रतिकूल. स्पर्धा/संमेलने /कार्यक्रम यात खंड. सभा/संमेलने यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील.

पायांची दुखणी बळावतील /वाढतील /या संबंधी त्रास वाढेल. हवामान बिघडेल/ प्रदूषणात वाढ. नट, कलाकार,गायक,चित्रकार स्त्रिया, खास करून स्त्री कलाकारांना प्रतिकूल अपघात होण्याची शक्यता श्रीमंत लोक मृत्यू पावतील.,नर्तिका,गायिका,प्रसिद्ध महिला,फॅशन डिझायनर ,रेडिओ ,दूरदर्शन कलाकार याना प्रतिकूल.
हा काळ सामाजिक दृष्टिने पण चांगला नाही.देशामध्ये घटस्फोटांची संख्या वाढते.,स्त्रियांवर अत्याचार झाल्यामुळे खळबळ उत्पन्न होणार. भगदड माजून मृत्यू.
समुद्रात मोठी वादळे, समुद्रातील अपघातात वाढ, जहाज,बोटी बुडतील, जलसमाधी,जलमृत्यू तसेच धार्मिक चळवळीत वाढ ,धार्मिक संस्था/ट्रस्ट किंवा यासंबंधी अनैतिक वर्तन/ चुकीचे किंवा बेकायदेशीर कृत्य (भ्रष्टाचार, फसवणूक, अन्याय करणे, नियमांचे उल्लंघन) अश्या प्रकारची प्रकरणे समोर येतील
परदेशातील व्यापारात अडचणी , काही गूढ मृत्यू होतील.

उद्योगधंदे /रोजगार याना प्रतिकूल, एखादा न आवडणारा कर वाढण्याची शक्यता. काही आंतरराष्ट्रीय करार बंद होतील/संकटात येतील. बँक आणि शेअर बाजाराला प्रतिकूल. शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार. बाजरात मोठी अस्थिरता दिसेल, गुंतवणूकदारांचे अंदाज चुकतील चलनाचे अवमूल्यन (Currency Depreciation). रुपयाची घसरण वाढणार.

या ग्रहणामुळे तेलाचे भाव वाढतील .मूग ,मसूर, कापूस,
गूळ ,गहू,साखर,सुती वस्त्रे ,तूप यांच्यात ३/४ महिने तेजी.

लेखक

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)
शेअरबाजार(StockMarket),सायबरकायदा(cyberlaw),तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा(dataprotectionlaw)तज्ज्ञआहेत.

ईमेल:jiteshsawant33@gmail.com

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *