मुंबईत झाला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक लोकार्पण सोहळा

 मुंबईत झाला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक लोकार्पण सोहळा

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर ऐरोली जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. हे स्मारक मुलुंडचे स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांच्या निधीतून उभारण्यात आले आहे.

या याप्रसंगी बोलताना आमदार मिहीर कोटेचा म्हणाले हे स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे ठरेल. जो कोणी अंदमान निकोबार ला जाईल आणि तेथे ज्या ठिकाणी सावरकर राहिले ती जागा पाहिल तो तो मनुष्य सावरकरांचं महत्त्व जाणेल. त्या सावरकरांच्या स्मृती जागवणं महत्त्वाचे आहे म्हणूनच आपण प्रभू रामचंद्र अयोध्या मंदिराच्या प्रतिकृती समोर सावरकरांचे हे स्मारक उभारत आहोत असं ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना रणजीत सावरकर म्हणाले जो हिंदू हित की बात करेगा वोही देश पे राज करेगा. असं म्हणत त्यांनी 2024 च्या येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विचार करून मतदान करावे असं आवाहन केलं. याप्रसंगी मुलुंड चे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रणजित सावरकर पुढे म्हणाले की वीर सावरकरांचे मत होतं होतं की धर्म आणि शस्त्र यांचा परस्पर संबंध आहे. त्यांचं मत होतं की जर धर्मावर शस्त्राचा अंकुश नसेल तर शस्त्र पाशवी असतं. शस्त्र जर माणुसकीसाठी वापरायचे असेल तर त्यावर धर्माचा अंकुश हवा. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी भारताची शक्ती काय असू शकते हे त्यांनी दाखवून दिलेले आहे.

जोपर्यंत तुमच्या हातात शस्त्र आहे जोपर्यंत तुमच्याकडे शास्त्र आहे. तोपर्यंत तुमचा शत्रू तुम्हास काही करू शकत नाही.
आज तुमच्या हातात एकच शस्त्र आहे ते म्हणजे बोट दाबून 24 च्या निवडणुकीत मतदान करणे जर तिथे तुम्ही चुकलात तर सगळेच चुकले असे समजा. त्यामुळे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, असा संकल्प करा. असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

ML/KA/SL

10 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *