खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी सत्याग्रह आणि साखळी उपोषण..

बुलडाणा, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2014 लोकसभा निवडणुकीत खामगाव-जालना रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन बुलडाणा जिल्ह्यातील जनतेला देण्यात आले होते. त्याची त्वरित पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी सत्याग्रह आणि साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
रेल्वे बोर्डाकडून खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी 50% निधी मागणी पत्रावर मंत्रिमंडळाने बैठकीत त्वरित मंजूरात करून देऊन तसे पत्र रेल्वे बोर्डाला तातडीने पाठवण्यात यावे..रेल्वे मार्गाची केंद्राने मान्यता तातडीने द्यावी..जमीन संपादन करण्यासाठी शासनाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी..यासह विविध मागण्यासाठी रेल्वे लोकांदोलन समितीने 12 जानेवारीपासून चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आणि साखळी उपोषण सुरू केले आहे.. Satyagraha and chain hunger strike for Khamgaon-Jalna railway line..
ML/KA/PGB
14 Jan 2024