भारताच्या लोकशाही व्यवस्थेत संसद हे जनतेच्या आवाजाचे सर्वोच्च व्यासपीठ आहे

 भारताच्या लोकशाही व्यवस्थेत संसद हे जनतेच्या आवाजाचे सर्वोच्च व्यासपीठ आहे

नवी दिल्ली, दि २२
आज लोकसभा पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला. दरम्यान लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्लाजी यांची सदिच्छा भेट ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी घेतली.
यावेळी खासदार संजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले… अधिवेशनात मतदारसंघातील विविध समस्या, महत्त्वाचे विषय यांचा पाठपुरावा करून संबंधित मंत्रालयांचे लक्ष वेधले. लोकसभेतील सत्रांमध्ये सहभागी होण्याचा आणि नव्या अनुभवांचा लाभ घेण्याची संधी लाभली.

ते यावेळी माध्यमाशी बोलताना म्हणाले की…’भारताच्या लोकशाही व्यवस्थेत संसद हे जनतेच्या आवाजाचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावरून मतदारसंघातील प्रश्न व अपेक्षा मांडणे, हा माझ्यासाठी सन्मान आणि जबाबदारी आहे’.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *