संभाजी ब्रिगेडने मंत्रालयात घुसून केला घटनाबाह्य सरकारचा निषेध.

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र सरकारने सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह अतिकुशल, कुशल, अर्ध कुशल व अकुशल कर्मचारी असे सर्वच पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा ६ सप्टेंबर २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णया विरोधात संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
आज मंत्रालयात घुसून घटनाबाह्य सरकारचा निषेध केला.यावेळी पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.
संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 2 ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू आहे.
संघटनेचे मुंबई अध्यक्ष राजेंद्र कांबळे, मंगेश लोहकरे, सुनील कोठावळे, प्रवीण मकवाना आदी पदाधिकारी उपोषणास बसलेले असता आतापर्यंत फक्त काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आझाद मैदानात येऊन उपोषणकर्त्यांची भेट दिली. संघटनेच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यांच्या व्यतीरिक्त सरकारच्या वतीने कोणताही नेता वा प्रतिनिधी येथे फिरकलेला नाही. सरकारकडून दखल घेतली नाही. या कारणास्तव आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे आणि महासचिव सौरव खेडेकर यांच्या सूचना व मार्गदर्शननुसार मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात घुसून या निगरगट्ट, निर्दयी घटनाबाह्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी बंदोबस्तवरील पोलिसांनी सर्व आंदोलन कर्त्यांना मंत्रालयातून ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे स्थानबद्ध केले आहे.
ML/KA/PGB 13 Oct 2023