सरसंघचालक भागवतांंनी केला ‘पंच परिवर्तन’ सिद्धांताचा पुरस्कार

अलिगढ, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी अलिगढ दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘एक गाव, एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशान’ या सिद्धांताचा जोरदार पुरस्कार केला आहे. सामाजिक सौहार्द आणि राष्ट्र उभारणीसाठी हा ‘पंच परिवर्तन’सिद्धांत आमलात आणणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
RSS कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले, “सामाजिक सौहार्द तेव्हाच प्रत्यक्षात येऊ शकतो, जेव्हा आपण ‘एक गाव, एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशान’ या सिद्धांताचे पालन करू… यामुळे समाजातील सर्व स्तरांमधील मतभेद, भेदभाव दूर होतील आणि एकोपा वाढण्यास मदत होईल.”
भागवत पुढे म्हणाले, “जर आपल्याला समाजात मोठे बदल घडवून आणायचे असतील, तर आपल्याला पाच बदलांवर (पंच परिवर्तन) काम करावे लागेल, ज्यात कुटुंब व्यवस्थापन, सामाजिक सौहार्द, पर्यावरण संरक्षण, आत्म-जागरूकता आणि नागरिक कर्तव्ये यांचा समावेश आहे.”