रायगडमधील पाचही प्रमुख नद्या लागल्या वाहू दुथडी भरून…

अलिबाग दि १९– रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी सकाळपर्यंत १०५ मीमी पावसाची नोंद झाली असून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवनी या पाचही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
पोलादपूर येथील लोहारे तुर्भे पुलाच्या लगतच्या कोल्हापुरी तंत्राच्या बंधाऱ्याला उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पुराचे पाणी लागले असून सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.
महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. ML/ML/MS