महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

 महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्राने द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव मांडला गेला. हा ठराव २४ मार्चला म्हणजेच सोमवारी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी त्याचे समर्थन केले. ‘महात्मा पदवी देशातील सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ होती आणि ती फक्त दोनच लोकांना मिळाली – महात्मा फुले आणि महात्मा गांधी,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *