प्रख्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन

मुंबई, दि. १० : आजची सकाळ भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरवणारी बातमी घेऊन आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे आज मुंबईत निधन झाले. आज दुपारी ४.३० च्या सुमारास दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत विक्रम गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
विक्रम गायकवाड यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पानिपत, बेल बॉटम ,उरी, डर्टी ब्लॅकमेल , दंगल , पीके, झांशी, सुपर 30, केदारनाथ अशा अनेक सिनेमात त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी निभावली आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी प्रसिद्ध रंगभूषाकार म्हणून जबाबदारी पार पडली होती.
पावनखिंड , फत्ते शिकस्त, शेर शिवराज अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी रंगभूषाकार म्हणून उत्तम कामगिरी केली. त्यांना दंगल, संजू, थ्री इडियट्स, भाग मिल्खा भाग, पानिपत अशा शेकडो सिनेमांचे मेकअप डिझायनर ते होते. 2013 साली बंगाली सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने ही गौरविण्यात आलं होतं.