मुंबईतील या सहकारी बँकेवर RBIची कडक कारवाई

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI मुंबईतील New India Co-operative Bank वर कडक कारवाई करून निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध १३ फेब्रुवारी २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील. आता बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत किंवा चालू खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. यासोबतच, बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही.
New India Co-operative Bank च्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे RBIने हे निर्बंध लादले आहेत. बँकेची बिकट अवस्था पाहून ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत आणि बँकेवर जास्त दबाव येऊ नये म्हणून हे पाऊल उचलले. आता ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत किंवा नवीन ठेवीही करता येणार नाहीत. यामुळे बँक ग्राहकांना खूप त्रास होऊ शकतो. सध्या हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लादण्यात आले आहेत. या काळात बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. RBI सहा महिन्यांनंतर पुन्हा या निर्णयाचा आढावा घेईल. बँकेला पगार, भाडे आणि वीज बिल यासारखे आवश्यक खर्च भागवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बँक कोणत्याही ग्राहकाकडून गुंतवणूक करू शकणार नाही किंवा नवीन ठेवी घेऊ शकणार नाही. बँकेची आर्थिक स्थिती आणि ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच वेळी पात्र ग्राहकांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा विमा दावा मिळू शकतो.
SL/ML/SL14 Feb. 2025