लोकांच्या हृदयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रवेश करीत आहे

नागपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- लोकांच्या हृदयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रवेश करीत आहे आणि समाजामध्ये संघाचा प्रभाव वाढत आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सर कार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांची पुन्हा निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रामलल्ला प्रतिष्ठापनेपूर्वी 1 ते 15 जानेवारी पर्यंत संघाच्या स्वयंसेवकांनी अक्षत वितरण कार्यक्रमात 20 करोड लोकांपर्यंत संपर्क केलेला आहे. मंदिर निर्माणच्या राष्ट्रीय अभियानात लोक जोडले गेले त्यामुळे हे संपन्न होऊ शकले असेही ते म्हणाले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाने संघटनात्मक दृष्टिकोनातून जो कार्य विचार केलेला आहे तो कार्य विस्ताराचा भाग असल्याचे ते म्हणाले. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात संघाचे कार्य आहे. समाजाच्या सर्व स्तरातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्टिकोनातून आज संघ एक राष्ट्रीय अभियान बनला आहे हे एका संघटने पर्यंत सीमित नाही असेही ते म्हणाले. समाज आणि संघ वेगळे नाहीत हेच आमचे स्वप्न आणि कल्पना असल्याचे ते म्हणाले.
Rashtriya Swayamsevak Sangh is entering the hearts of people
PGB/ML/PGB
17 March 2024