कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप : पूरस्थिती कायम

कोल्हापूर दि ६(एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पावसाची उघडझाप सुरू असून पुराचा धोका अद्याप कायम आहे . मात्र जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले झाले असून वारणा, राधानगरी धरणाचा विसर्गही कमी झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 53 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. मात्र आता दहा मार्ग पूर्ण, तर तीस मार्ग अंशतः बंद आहेत. इथं पर्यायी मार्गानं वाहतूक वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीचं पाणी फुटानं कमी झालं. आज सकाळी आठ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा एक इंचानं कमी म्हणजेच 38.11 फुटांवर होती धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे.
पाऊस कमी असला तरीही एका दिवसात ४७ मिळकतींची पडझड झाली. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून जोरदार श्रावण सरी कोसळत राहिल्या, पण गेल्या आठ-दहा दिवसात पहिल्यांदाच पंचगंगेचं पाणी एक फुटानं कमी झालं. त्यामुळे दिवसभरात चौदा बंधारे पाण्याखालून मोकळे झाले आहेत. राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजा बंद झाल्यानं विसर्ग कमी झाल्यानं पुराची पातळी कमी होत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासूनपावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र,अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. पुराचं पाणी हळूहळू शुक्रवार पेठेतील गायकवाड वाड्यापर्यंत गेलं आहे. धरणक्षेत्रातही तुलनेत पाऊस कमी असल्यानं विसर्ग कमी झाला आहे.राधानगरी आणि वारणा धरणातून विसर्ग कमी झाला आहे.
पुरामुळे भात सोयाबीन सारखी पिकं पूर्ण कुजली आहेत. ऊसातही पाणी गेल्यामुळे ऊस उत्पादनात घट होणार आहे पुराच्या पाण्यानं एस. टी. महामंडळ मोठे नुकसान झालं आहे. आता एस. टी.ची चाकंहळूहळू पूर्वपदावर येऊ लागली
आहेत. गेल्या चार दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे, तरीही पडझड थांबण्याचं नाव घेत नाही.काल कोल्हापूर जिल्ह्यात ४७ मालमत्तांची पडझड होऊन १५ लाख २४ हजारांचे नुकसान झालं आहे.
ML/ ML/ SL
6 August 2024