जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस.

जालना, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पडलेल्या पावसामुळं मका, कपाशी, मिरची पिकांना फटका बसला असून काही ठिकाणी पिकं आडवी झाली त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. Rain with gale in Jalna district.
जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव,हिवराबळी शिवारात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. दोन ते अडीच तास हा पाऊस झाला.या पावसासह वादळी वाऱ्यामुळे कपाशी, मका,सोयाबीन,मिरची पिकाला फटका बसला असून ही पिकं जमिनीवर आडवी झाली आहेत.यामुळे होत्याचं नव्हतं झालंय. आतापर्यंत या भागात एकही पाऊस या हंगामात झाला नाही.
रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पिकं बहरवली होती .पण अडीच तासाच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठ संकट उभे राहिले आहे.आता या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ML/KA/PGB
29 Sep 2023