कोल्हापूर, सांगलीमध्ये बहुतांश भागाला पावसाने झोडपले

कोल्हापूर दि २३– दिवसभर उन्हाच्या तप्त झळानंतर कोल्हापूर शहरासह, जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यात रात्री साडेआठच्या सुमारास वादळी वान्यासह धुवांधार पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, विद्युत खांब कोसळले, घरांचे पत्रे उडाले. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
जोतिबा डोंगरावरील गुलालमय शिखरे, परिसर धुवून निघाले. श्री जोतिबा मंदिरावर अखेर वरुणराजा बरसला. यामुळे मंदिर गुलालमय झालेली सर्व शिखरे आणि परिसर धुऊन निघाला. तासाहून अधिक लागलेला पावसाच्या सरींनी परिसर थंड झाला. वादळी वा-यासह झालेल्या अनेकांचे मांडव छत कोलमडून पडले.
शेतकऱ्यांना दिलासा देवाळे ढगांचा प्रचंड गडगडाट सुरू झाला आणि विजा चमकू लागल्या. काही वेळातच देवाळे, हळदी, कोळी, कुरुकली, सडोली भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. आजरासह साळगाव, पेरणोली येथे पाऊस पडला. गवताची गंजी जळणाची लाकडे , अन्य जळणाचे साहित्याचे नुकसान झाले. बाजारपेठेतील रहदारी कमी झाली होती. राशिवडे शिवसह वडे, कोटवडे, मोहडे परिसराला पावसाने झोडपले. विजेचा कडकडाट आणि पावसामुळे विद्युत पुरवठा बंद केल्याने उकाड्याची तीव्रता वाढली लक्षतीर्थ वसाहत, धान्य गोडावून परिसरात घरांवर झाड कोसळले.
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जयंती नाला परिसरातील रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. व्हिनस कॉर्नर, कोडाओळसह शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी पाणी साचले. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. अनेक ठिकठिकाणी छोटी-मोठी झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळल्या, अग्रिशमन विभागाकडील माहितीनुसार शहरात १५ ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली.
सांगली जिल्ह्यात मुसळधार गारांच्या पावसामुळे फळ पिकांचे नुकसान. वीज पडून आरग येथील एक शेतकरी जागीच ठार झाला. जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या मुसळधार गारांच्या पावसामुळे फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आरग येथील एक तरुण शेतकरी उदय विठ्ठल माळी वय 33 यांच्या अंगावर वीज पडल्यामुळे ते जागीच ठार झाले.दिवसभर उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी पाच नंतर सांगली जिल्ह्यातील हवामानात बदल झाला.
तासगाव सांगली मिरज या ठिकाणी गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यात आंबा द्राक्ष केळी, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी वाऱ्यामुळे दुष्काळी पूर्व भागातील अनेक ठिकाणी फळांची पडझड झाली. मिरज अथणी मार्गावर अनेक झाडे पडली. या रस्त्यावर वाहतूक बराचवेळ खोळंबली होती. पावसामुळे येळावी येथे सिद्धेश्वर यात्रेसाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.