राहुल गांधी काढणार मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस खासदार राहूल गांधी यांनी २०२३ मध्ये दक्षिण-उत्तर भारत दरम्यान भारत जोडो यात्रेचे आयोजन केले होते. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत. ही यात्रा पूर्व-पश्चिम भारता दरम्यान काढण्यात येणार आहे. भारत न्याय यात्रा १४ जानेवारीला मणिपूरपासून सुरू होईल आणि २० मार्चला मुंबईत संपेल.
ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमार्गे महाराष्ट्रात संपेल.
राहुल बसने आणि पायी 6 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्ष भारत न्याय यात्रा काढणार आहे. राहुल गांधी हे या यात्रेचा प्रमुख चेहरा असतील.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय हा भारत न्याय यात्रेचा उद्देश आहे.या यात्रेदरम्यान राहुल तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांना भेटतील. बस प्रवासाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील. प्रवासातील काही छोटे भाग मधून मधून पायी कव्हर केले जातील.
दरम्यान २८ डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाची नागपुरात मेगा रॅली होणार आहे. त्याचे नाव आहे- हैं तैयार हमत. ही मेगा रॅली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शंखनाद असेल.
SL/KA/SL
27 Dec. 2023