मराठी भाषेला जागवण्यासाठी जनतेचा दाब हवा

पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी भाषेची अवस्था सध्या वाईट असून लोकशाही व्यवस्थेत मराठी भाषा जगविण्याकरता लोकांनी दाब निर्माण केला पाहिजे तरच मराठी स्थान अबाधित राहील असे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात सेंटर फाँर पाँलिसी अँड गव्हर्नन्स यांच्यावतीने मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन भांडारकर इन्सिट्युट येथे करण्यात आले होते.
या चर्चासत्राला मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, केंद्र सरकारचे अधिकारी,लेखक आदी उपस्थित होते. मराठी भाषेला जिवंत ठेवायचे असेल तर रोजच्या जीवनात पुरेपुर मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे.शासनावर विसंबून न राहता नागरिकांनी या भाषेला जिवंत ठेवण्याकरता पुढे आले पाहिजे. तसेच मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण दिल्यास त्यांच्या बुध्दीचा विकास होईल. याकरता चळवळ उभी केली पाहिजे असा सूर या चर्चासत्रा दरम्यान उमटला. या चर्चा सत्रामध्ये प्रशासकीय आणि न्यायालयीन मराठी भाषा,मराठी माध्यमातून शालेय आणि उच्च शिक्षण,मराठी भाषा संशोधन आणि ग्रंथ प्रसार या विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. Public pressure is needed to wake up Marathi language