समृध्दी महामार्ग आणि इतर महामार्गावरील अपघातावर नियंत्रण यासाठी  लोकसहभाग अत्यावश्यक!

 समृध्दी महामार्ग आणि इतर महामार्गावरील अपघातावर नियंत्रण यासाठी  लोकसहभाग अत्यावश्यक!

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “समृध्दी महामार्ग  आणि इतर महामार्गावरील अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणेतील त्रुटी दूर करणे तसेच जनजागृतीसाठी  लोकसहभाग अत्यावश्यक आहे. त्यासाठी संबंधित  विभागाने पुढाकार घेऊन कृतीच्या अंमलबजावणीसाठी समन्वय करावा. तसेच प्रवास वाहतूक निर्धोक होण्यासाठी सर्व चालकांसाठी आचारसंहिता, स्त्री,पुरूष व दिव्यांगासाठी  स्वच्छतागृह,सुसज्ज रुग्णवाहिका , हेल्पलाइन नंबर्स ची माहिती उपलब्ध द्यावी असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी  परिवहन,बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग चे अधिकारी यांना केले.

महामार्गावर मागील दहा पंधरा दिवसात भरपूर अपघात झाले आहेत. त्यासाठी संबंधित  विभागाच्या  अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आज विधान भवनातील समिती कक्षात घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी राज्यातील अपघाताबाबत संपूर्ण  माहिती घेऊन निर्देश दिले की, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा विमा आवश्यक आहे. यासंदर्भात वाहनांची करावी. सर्व प्रकारच्या वाहन चालकांसाठी आचार संहिता तयार करावी.वाहन चालक, वाहन मालक तसेच सामाजिक संघटना तसेच संबंधीत अधिकारी यांची  दक्षता समिती तयार करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गावर स्वच्छतागृह  किमान अंतरावर असावीत. गुगल मॅप वर स्वच्छतागृहांचे लोकेशन टाकावे, दिव्यांग लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. इमर्जन्सी दरवाजे तात्काळ उघडावेत यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्यावी. याबाबत लोकांना त्याची माहिती देण्यात यावी अशाही सूचना त्यांनी दिल्या.

महामार्गावर ट्रॅफिक पार्क करावीत,ट्रॉमा सेंटर्स व ॲम्बुलन्सची पूर्ण वेळ व्यवस्था करावी व त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. अपघात होऊ नयेत म्हणून सार्वजनिक वाहन चालक,स्वयं चालकासाठी  आचारसंहिता तयार करावी आणि त्याचे समुपदेशन  करण्यासाठी छोटे छोटे रिलस आणि फिल्म तयार करावी.Public participation essential to control accidents on Samruddhi Highway and other highways!

जिल्हा नियोजन मधील एक टक्का निधी रस्ते सुरक्षासाठी वापरता येतो. याबाबत जिल्हानिहाय
बैठका होतात. त्याचे प्रोसेडींग मधील सूचना आणि समान विषय यांचा समन्वय करून आणि त्याचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी करावा.

राष्ट्रीय महामार्गावर युद्ध पातळीवर दहा टक्के तरी स्वच्छतागृहे  प्रायोगिक  तत्वावर तयार करावीत.
स्वच्छतागृहाची लोकेशन गुगल मॅप वर टाकावी. 
समृद्धी महामार्गावर जाताना वाहन तपासणी करण्याची व्यवस्था व्हावी तसेच आणि वाहन चालकांना प्रशिक्षण व समुपदेशन करावे. समृद्धी महामार्ग वरील हेल्पलाइन 8181818155 सर्वांना माहीत व्हावी म्हणून बोर्ड लावावेत.

इतर राष्ट्रीय महामार्गावर हेल्पलाइन नंबर ११२ आहे तो सर्वांना समजण्यासाठी व्यवस्था करावी तसेच  अपघाताचे ब्लॅक स्पॉट येण्या पूर्वी साईन बोर्ड ठळकपणे लावलेत अशा ही सूचना डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *